तब्बल १६ वर्षापूर्वी हौस म्हणून बनवलेला ब्लॉग आज परत अचानक उघडून बघितला. आणि जुन्या आठवणी परत एकदा घेरून बसल्या.
तेव्हा वाचायचं वेड अगदी भरात होत आणि माझ्या हातून कधी काळी काही लेखन होईल अशी पुसटशीही कल्पना केली न्हवती. वर्तमानपत्रात काही फुटकळ पत्र आणि मराठी संकेतस्थळावर थोड्या फार प्रतिक्रिया, इतकंच काय ते प्रसिद्ध झालेल लेखन. लिहिण्याची कितीही इच्छा असली तरी पेन हातात धरल्यावर नक्की कशावर लिहायच ते न सुचल्याने आमची गाडी गेल्या कित्येक वर्षांपासून अडलेली होती.
अस म्हणतात की देवाने हे जग बनवलं आणि मग स्वतःची सुंदर निर्मिती पाहून त्याला आनंद झाला. हा आनंद कोणाला तरी सांगावा म्हणून त्याने स्वतःतून मनुष्याची निर्मिती केली. एकोहम बहुअस्या…
मलाही हा आनंद वाटायचाय.. खूप सारी पुस्तके वाचली, लहानपणापासून निसर्गाच्या अगदी कुशीत वाढले अस म्हंटल तरी चालेल इतक झाडाझुडपात रमले. मोठी झाल्यावर शहरात आल्यावर कळल की जे आपण अनुभवलं ते फार अनमोल होत.. आणि ते मला आता तुम्हाला सांगवस वाटतय…
त्यासाठी हा ब्लॉगप्रपंच…
फेसबुक आणि इंस्टा वर जस मला तुम्ही भरभरून प्रोत्साहन दिलत, तसंच इथेही द्या, अशी थोडी मैत्रिपूर्ण हक्काची विनंती…..
No comments:
Post a Comment